महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे ‘जो न खाई भोगी, तो सदा रोगी’. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी bhogi bhaji केली जाते. या भोगीच्या भाजीला विशेष महत्त्व आहे. भोगीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण तीन दिवस साजरा करतात. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकरसंक्रांत आणि तिसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बनवली जाते. हिवाळ्यात थंड वातावरण असल्यामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जेची आवश्यकता असते. शरीराची ही गरज पूर्ण व्हावी म्हणून भोगीच्या दिवशी मिक्स भाज्या बनवल्या जातात. वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाणे यांसारख्या हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. तसेच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवतात. या मिक्स भाजीमुळे आणि भाकरीमुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते.
भोगीला अनेक भाज्या बनवण्याची प्रथा असल्याने शेतकरी देखील या काळात आपल्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या घेतात. परिणामी निसर्ग संपन्नेत विविध पिकांची भर पडते.