मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग अद्यापही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढतच  आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंधाचा कालावधी देखील वाढवण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील कोरोनाची रुग्ण वाढ सुरुच आहे. आज राज्यात 53 हजार 605 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 864 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देणारी बाब म्हणजे आज राज्या सर्वाधिक 82 हजार 266 कोरोना रुग्ण बरे झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.03 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 43 लाख 47 हजार 592 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे उपचारादरम्यान 75 हजार 277 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.49 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 50 लाख 53 हजार 336 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.