* उन्हाळ्यात पनीर अधिक प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. पोट बिघडू शकते. म्हणून उन्हाळ्यात पनीर मर्यादेतच खावे.

* पनीरमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो. उच्च रक्तदाब समस्या आहे त्यांनी पनीर खाऊ नये.

* ज्यांना अ‍ॅसिडीटीचा त्रास आहे, त्यांनी कमीतकमी पनीर खावे. विशेष करून उन्हाळ्यात हा नियम पाळावा.

* पनीरमध्ये प्रोटीन अधिक असल्यामुळे अधिक प्रमाणात पनीर खाल्यास जुलाब, अतिसाराचा होण्याचा त्रास होऊ शकतो.

* एका वेळेस केवळ १०० ग्रॅम पनीर शरीराला पुरेसं असतं. तसेच पनीर पचायला जड असल्याने रात्री उशिरा खाणे टाळावे.

* कच्चे पनीर खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो.

* हृदय तंदुरुस्त ठेवायचे असेल आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर पनीरचे सेवन कमी करा. पनीरचे जास्त सेवन केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. हृदयरोग होऊ शकतो.