ऊन्हाळ्यात ऊन्हाचा ताप वाढला की थंड पाणी प्यावंसं वाटतं. मग अनेकजण फ्रीजमधील पाणी पितात. यामुळे सर्दी, खोकला, ताप याचा त्रास जाणवतो. म्हणून ऊन्हाळ्यात माठातील पाणी प्यावे. तज्ञ मंडळीही माठातील पाणी पिण्याचा सल्ला देतात. माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

*पचनक्रिया सुधारते-
माठ मातीपासून बनवला जातो. त्यात कोणतेही रासायनिक घटक नसतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यात माठातील पाणी महत्वाची भूमिका बजावते.

*घशाशी संबंधित आजार दूर ठेवते-
फ्रीजमधील पाणी प्यायले तर घशाशी संबंधित आजार होतात. परंतू माठातील पाणी प्यायला तर हे आजार दूर होतात. माठातील पाणी प्यायल्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही.

*त्वचा चमकदार होते-
सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी माठातील पाणी प्या. यामुळे रक्तशुद्धीकरण होईल. तसेच चेहरा तजेलदार राहिल. असे रोज केलं तर तुमचा चेहरा चमकदार दिसू लागेल.

*पित्तनाशक-
माठातील पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील पीएच संतुलित राहते. त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

*रोगप्रतिकारशक्ती वाढते-
माठातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यासही मदत होते.